सूर्योत्सव - मकर संक्रांती



संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशींतून दुसऱ्या राशीत जातो यालाच संक्रांत म्हणतात. पौष महिन्यात सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणुन या उत्सवाला 'मकरसंक्रांत' असे म्हणण्यात येते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणुन त्या काळाला 'उत्तरायण' ही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्यादेखील महत्व आहे.

संक्रांत हे मोठे धार्मिक व्रत आणि सण आहे. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन. अशा १२ संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मोठी मानतो. संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे, या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य पुन्हा परत करत असतो असे मानतात.

सूर्य आणि इतर ग्रह यांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ किती असतात याचे वर्णने हेमाद्रीनी वर्णन केले आहे की, सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाल संक्रातीच्या पूर्वी आणि नंतर १६ घटीकापर्यंत असतो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी क्रिकांत असते. या दिवशी कोणत्याही शुभकार्याला आरंभ केला जात नाही. सौराष्ट्रामध्ये या सणाला 'उत्तरायण' असे म्हणतात किंवा 'उतराण' म्हणतात या दिवसानंतर सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा थोडा मोठा होऊ लागतो.

'संक्रांत' म्हणजे संक्रमण, पुढे जाणे. आर्य लोक उत्तर धुवावर राहत होते त्या वेळेचा हा सण आहे. संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो. भोगी क्रिकांत हा सण रथसप्तमीपर्यंत हा सण साजरा करण्याची पध्दत आहे. संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. धनु संक्रांतीपासुन मकर संक्रांतीपर्यंच्या काळाला धनुसंक्रांत म्हणतात.

सूर्य हा तुला राशीत आला की त्याचा प्रभाव कमी होत जातो म्हणून थंडी पडत असते. सूर्य मेष राशीत आला की, त्याचा प्रभाव वाढतो म्हणून गरम होत असते. मिथून राशी ही कोरडी राशी आहे. सूर्य कर्केत गेला की पाऊस पडतो, कन्येत गेला की पाऊस संपतो, दिवसभर उकाडा व रात्री थंडी अशी स्थिती असते.

सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतात. मकर संक्रांतीच्या आयुर्वेद वेळेस किरण लंबरूपाने पडायला लागतात.

या सणाविषयी कथा अशी आहे की, पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता. तो खूप उन्मत्त झाला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले. ही देवता साठ योजनेत पसरली असून तिचे ओठ-नाक लांबलचक असून तिला नऊ हात असून तिची आकृती पुरुषासारखी आहे. प्रत्येक वर्षी तिचे-वाहन आयुधे बदलतात अशी कल्पना, संक्रासुर आणि नीसांसुर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणुन या दिवसाला तिच्याच नावाने ओळखतात. या दिवशी सुवासीनी स्त्रीया वाण देतात व घेतात अशी पध्दत आहे.

भिष्म उत्तरेकडील स्वर्गद्वारे उघडेपर्यंत शरपंजरी पडून राहिले व तद्नंतर देह सोडला म्हणून या दिवशी पितर, सवाष्ण जेवायला घालतात. आर्यांनीच सूर्याचे शक्तीमुळे विश्वातील सर्व कारभार चालू असल्याचा शोध लावला. सूर्याची उपासना करून गायत्री मंत्रासारखा दिव्य मंत्र विश्वामित्राला स्वतः सूर्याने विश्वाच्या कल्याणासाठी दिला. त्यांनीही तो स्वतः जवळ न ठेवता तमाम मानव जातीस देऊन संबंध विश्वाचे मित्रत्व व भारतीय संस्कृतीचा आदर्श ठेवला. सूर्य हा संबंध विश्वाचा खरा निरपेक्ष मित्र आहे. त्याच्या पूजेचा हा दिवस आणि याच पेड आदर्शातून मित्रत्वाची वाढ व्हावी म्हणून या दिवशी मोठ्यांनी लहानास तिळगूळ देऊन स्नेह व गोडी तत्वरूपाने करतात. कोणार्क येथे फार मोठ्या रथावर बसलेल्या सूर्याचे मंदीर आहे. अरुणाचल, मेघालय अशी सूर्याच्या संबंधीत नावे भारतातील प्रदेशांनाच आहे. यादिवशी सुवासिनी सूर्याची पूजा करून दुसऱ्या हंगामातील धान्ये, फळे (ओला हरबरा, बोर, ऊस) वगैरे लुटण्याची पध्दत देशकाल परत्वे पडली आहे. भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा करतात.

भारतीय संस्कृतीत स्त्रिया उगवत्या सूर्याच्या प्रतीकाचा रंग असलेले कुंकू माथी लावतात. त्यामुळेही हा सूर्याचा सण मानतात. या दिवशी केंद्रावर किंवा घरोघरी स्त्रिया हळदीकुंकू समारंभ करतात. तसेच तिसरा डोळा किंवा सूक्ष्मबुद्धिचे उगमस्थान असते. तसेच ध्यानयोगात सूर्यज्योत प्रगट होते. त्यांचीच बाहेरून प्रतिकात्मक पूजा, सतत स्मरण म्हणुनही

हळदकुंकू, गंध हिंदू संस्कृतीत लावतात. सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रावर "सा विद्या या विमुक्तये" या आर्य संस्कृतीतील ब्रीदाचे पालन करतांना, गायत्री मंत्रापासून अनेक मंत्र महत्वाची स्तोत्र, ग्रंथ वाचण्याची पध्दती अनेक दुर्लभ उतारे, दृष्टी, तोडगे, अती आजारातील उपचार, वाढदिवसाची भारतीय पध्दती

यांचे सुबोध संकलन असलेले नित्यसेवा, नावाचे अनमोल भांडार लुटले जाते. ज्ञानदानासारखे बीते

श्रेष्ठ दान कुठलेच नाही हे वरील विवेचनावरून सर्वाना समजावे या शिवाय ऐपतीप्रमाणे स्यामीचरित्र, दुर्गासप्तशती श्री गुरुचरित्र, विवाहसंस्कार, ज्योतीषशास्त्र, माळ, क्षात्रधर्म, आयुर्वेद, मराठी अस्मिता असे ग्रंथ व पुस्तक उपलब्ध आहे याचे त्या दिवशी दान करावे.

सर्व सेवा केंद्रात प्रत्येकाने आणलेला तिळगुळाचा नैवेद्य दाखवुन या विश्वाचे चालक, पालक, मालक श्री स्वामी समर्थांचा प्रसाद म्हणुन तिळगुळ वाटतात. रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकु केव्हाही करतात.

* संक्रातीचे हळदीकुंकू -

मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांती नंतरच्या दुसऱ्या दिवसापासुन रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकुवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो. सौभाग्य वाढवण्यासाठी या उपक्रमात सुवासीनींनी वाण लुटायचे असते. याचे सामाजिक महत्वही आहे.

या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना, इष्ट सोयरे मैत्रीणींना आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपुस करून स्नेहाचे बंध अधिक पक्के करता येतात. आपल्या ऐपतीनुसार वाण लुटता येते. विनाकारण पैशाचा बडेजाव करू नये.

पूर्वीच्या काळी खेड्यांमध्ये शेतात यावेळी तयार होणाऱ्या कोवळ्या गव्हाच्या ओंब्या, बोरे, ऊसाचे तुकडे, गाजर, हरभऱ्याचे कोवळे घाटे असे पदार्थ एकमेकांना दिले जात असे. पेशव्याच्या काळात हळदकुंकवाचा कार्यक्रम बायकांमार्फत पेशवे करून घेत असत त्यामुळे चांगले संबंध प्रस्थापित करून आपआपसातली बंडाळी मोडून काढीत असत. यासाठी गोपीकाबाईनी केलेले हळदीकुंकु प्रसिध्द आहे.

कोणतीही वस्तू देण्यापेक्षा आपण आजच्या काळाची गरज ओळखुन लोकांना संस्कारीत केले पाहिजे. प्रत्येक घराला योग्य कर्तव्याची ओळख करून देईल, माणुसकी व ईश्वरसेवा घराघरात रुजवेल असे अल्पमोली बहुगुणी घ्यायला सर्वाना निश्चित आवडेल. म्हणुन या संक्रातीला आपण सर्व सेवेकरी महिलांनी केंद्रात असो वा घरी हळदीकुंकवासाठी आपल्या केंद्राचे छापील साहित्य, दिनदर्शिका, आयुर्वेद उत्पादने, शुभ अशा ५ वनस्पतींचे (पांढरी रूई, जास्वंद, कण्हेर, शेवंती, भुईरिंगणी) वाण लुटावे.

आपल्या मार्गाच्या सर्व ग्रंथातून, दिनदर्शिकेतुन, श्री स्वामी सेवा मासिकातून गृहस्थ जीवनाचे मार्गदर्शन दिले आहे. आध्यात्मिक प्रश्नांचे संसारातील अडचणींचे योग्य उपाय दिले आहेत बालसंस्कार, पालकसंस्काराचे उत्तम कार्य ही ग्रंथसंपदा सातत्याने करीत आहेत. म्हणुन त्यांना सौभाग्यवान रूपात सेवेकरी नसलेल्या असलेल्या घरात पोहचवणे. त्यामुळे श्री यामी समर्थ मार्गाचा प्रचार होईल व ज्ञान प्राप्त होईल. बाजारातल्या महागड्या व निरूपयोगी वस्तू न आणता आपले साहित्य मनामनापर्यंत पोहचविणे आद्य कर्तव्य आहे. जेणेकरून हाराजांच्या प्रचार प्रसार कार्याला हातभार लागेल असेच दान द्यावे.

या उत्सवात तीळाच्या लाडयांना महत्व मिळाले त्याचे नैसर्गिक कारणही आहे. निसर्ग ऋतुनुसार फळे व वनस्पती देतो. ज्या ऋतुत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते त्या ऋतुत या रोगानुसार औषधी वनस्पती फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो. रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो. तीळात स्निग्धतेचा गुण आहे व गुळ हा उष्ण मानला जातो, त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतुतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करते, घरात शेतातून ताजे तीळ आलेली असते म्हणुन या दिवशी तिळगुळ खातात.

शेतकरी या दिवशी शेतात सीतामातेला नैवेद्य देत असतो. त्या दिवशी एक व्यक्ती जेवेल एवढे अन्न शेतात मधोमध खड्डा करून टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी. की 'माझे तू घे, तुझे मला दे.' अशा पध्दतीने संक्रांतीसण साजरा करतात व या दिवशी तिळगुळ देऊन म्हणतात.- "तिळगुळ घ्या गोडगोड बोला ! "

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या